जगण्याचा मी हक्क निभावत असतो असे म्हणत अजब ह्यांनी आम्हास कमालीचे निभावित, आपलं, प्रभावित, केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेच आहे :

"की राजहंसाचे चालणे जगी झालिया शहाणे
म्हणून काय कवणे चालोची नये ?" (चू. भू.दे. घे.)
ह्यास माऊलींची अनुज्ञा मानून, अजबरावांप्रमाणे सुंदर गझला लिहिता येत नसूनही आम्ही लिहिण्याचे औद्धत्य करीत आहोत.

जगताना मी मख्ख मुलागत असतो
श्वासांची मी करत मशागत असतो

पकण्याचा मी हक्क निभावत अस्तो
लेक्चरला मी डुलक्या काढत असतो

खाणे नसले फार जरी ते माझे
किलो-किलोने सतत बळावत असतो

कविता माझ्या विशेष नसल्या तरिही
इतरांच्या मी रोजच ढापत असतो

बाप लागता मागे माझ्या तिचा
जीव घेउनी मुठीत धावत असतो

बोलत आहे 'ती' माझ्याशी ऐसे
दिवास्वप्न मी नित्यच पाहत असतो

नजरेने ती मला खुणावत असते
नजर तिची मी कायम चुकवत असतो

वाचत नाही कोणी त्याचे लेखन

'खोडसाळ' का तरी फुशारत असतो ?

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds