कविवर्य सुरेश भट यांची सुरेश वाडकर यांनी गायलेली गझल "तोरण" सर्वश्रुत आहे. ज्यांनी ती ऐकली नसेल वा ज्यांना ती पुन्हा ऐकायची असेल त्यांनी खालील प्लेयरच्या ।> बटणावर टिचकी मारावी.
|
या सुंदर तोरणावर आमच्या खोडसाळ मेंदूने घातलेले विरजण असे :
आता नहायाचे असे माझे किती क्षण राहिले ?
लावावयाचे तेव्हढे अंगास साबण राहिले
येथे ठगायाचे असे माझे किती जण राहिले ?
थांबावयाचे येथ मज काही न कारण राहिले
चुंबावयाला चंद्रमा बाहूत घे ही तारका
माझे तरी माझ्यावरी कोठे नियंत्रण राहिले ?
ते लोक अरसिक, आंधळे टाळून मज गेले पुढे
मी मात्र चोरून पाहते - मागे किती जण राहिले
कवटाळण्या बघती मला दाही दिशांचे टोणगे
सारेच प्रेमाचे जुने लावीत लांबण राहिले
थोबाड माझे जर मुळी नाही बघायासारखे
पतिदेव का तव मजवरी होऊन लिंपण राहिले ?
"हो अष्टपुत्रा" बोलली लग्नात सारी माणसे
ठेवून त्यांचा मान का ना सांग गाभण राहिले ?
धर 'खोडसाळा' धीर तू, पळुनी कुठे मी चालले ?
लावावयाचे तेव्हढे अद्याप विरजण राहिले
Labels: विडंबन
0 Comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)