खोडसाळाला काही मधुर रात्रीची सोबत-बिबत मिळत नाही. त्यामुळे चांदण्या रात्रीही लेखनकामाठीतच वाया घालवाव्या लागतात.
सांगा कुणी लेखकास
सोड हा यमकांचा ध्यास
मिसळले त्यात अनुप्रास
निसटली कवितेची कास
भुणभुणती शब्दांचे डास
एकेक ओळ लिहावी एकेक तास
असे वाटे साऱ्या वाचकांच्या मनास
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास
पाडल्याचा येत आहे वास
खोडसाळाला मिळाला काव्यघास...
खोडसाळाला मिळाला काव्यघास...
Labels: विडंबन
1 Comment:
-
- HAREKRISHNAJI said...
12:17 pmपहील्याच घाशी मक्षीकाःप्रात
Subscribe to:
Post Comments (Atom)