खाल्ल्यानंतर

आमच्या प्रेरणेचे उगमस्थान : भूषण कटककरांची गझल "विरहानंतर"


डेस्सर्ट असते, हे जेवण संपवल्यानंतर
खातो आहे, तुम्ही तुमचे ठरवा नंतर

"कसे बनवले आहे?" म्हणते पुढे येउनी
बोलवेचना मला तोबरे भरल्यानंतर

हवेत जाताना प्रश्नाचे उत्तर कळले
काय भरावे पेल्यामध्ये सोड्यानंतर...

किती जिलेब्या उदरी होत्या उगीच साठुन
किती मोकळे वाटत आहे रेच्यानंतर

तुझ्या विचारांमध्येच
व्यत्यय तुझ्याच भगिनी
असेच होते लग्न एकिशी झाल्यानंतर

उपास नसता खाउन घ्यावे गुलाबजामुन
रसगुल्ले थोडे मटकावे त्यांच्यानंतर?

काय घालता भीती खाताना वजनाची?
बोला डायटवाल्यांनो...पण खाल्ल्यानंतर

त्याच्याइतके वाइट नाही अपचन ’खोड्या’
जे होते पोटामध्ये...कलकलल्यानंतर

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds