प्रेरणा : वैभव जोशी यांची गझल ह्या कशा उबदार ओळी


ह्या कशा चवचाल ओळी, शब्द हे ’तसले’ पुन्हा
हाय!बच्चा कंपनीवर बाप खेकसले पुन्हा

ह्या कशा रचल्यास ओळी, शेर हे फसले पुन्हा
हाय!कच्च्या शाहिरा उस्ताद खेकसले पुन्हा

"सासरा, दारू, मुली, लफड्याविना कविता कशी?"
वाचणारे चेहरे झटक्यात खसखसले पुन्हा

हुडहुडी भरली तनाला, गालफडही तापले
काय बोटांचे ठसे गालावरी ठसले पुन्हा

अजुन त्यांची ठेवली नाहीच का पत्रावळी ?
कावळे झाडावरी जाऊनही बसले पुन्हा!

मज न चुंबन प्रेयसीने, अन्‌ न पत्नीने दिले
"संपला मधुचंद्र, आता चोचले कसले पुन्हा?"

मी नझल लिहिली तरीही वाजल्या टाळ्या किती
नाव माझे पाहुनी का लोकही फसले पुन्हा ?

"मायला!असला चुना का लावला कोणी कधी?"

खोडसाळा साफ हे बोलू नको असले पुन्हा

0 Comments:

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds