कुणीतरी अम्हा पटापट कविता वाचून सांगेल काय

या ओळींमध्ये दडलय काय ?
या रचण्यावाचुन अडलय काय ? ॥धृ॥


काव्य म्हणतो जिला कवी
पाडत असतो रोज नवी
कशास अमुच्या माथ्यावरती मारायाला हवी ?
कराल केव्हा, कविवर, तुमच्या काव्याची भैरवी ? ॥१॥


सुनीत कोणी करी इथे
गझलांचे खच जिथे-तिथे
नवकाव्याचे, गांभिर्याचेही दिसती चाहते
विडंबनाची सरिता कायम दुथडीने वाहते ॥२॥


मात्रावृत्ती असे कुणी
अक्षरगण-कट्टर कोणी
कविता कसली, लघु-गुरूची क्रमवारी-मोजणी
बेरीज चुकता म्हणे कवी ही मुक्तछंद-बांधणी ॥३॥

3 Comments:

  1. आशा जोगळेकर said...
    Mast khodee.
    प्रशांत said...
    छान.
    आज विडंबन नाही वाटतं? ;-)
    क्रांति said...
    vaa!

Post a Comment



Newer Post Older Post Home

Blogger Template by Blogcrowds