कविवर्य कुसुमाग्रजांची क्षमा मागून, "समिधाच सख्या या" या त्यांच्या अप्रतिम कवितेवरून सुचलेल्या ओळी देण्याचे धार्ष्ट्य करीत आहे.
भ्रांतिष्ट कुणीसा कवी करी ही कविता
भेटते जिच्यातुनि त्याची जीवन-वनिता
तडतडे, बडबडे, मुके न दे, फेटाळे
कवी अखंड पाहे वाट प्रेरणेकरिता !
लडिवाळ कान्त तो ही सोडून निघाली
अन् शोधित प्रियकर रानातून ढमाली
नच रम्य बांधणी, सुडौल अथवा घाट
तोंडावर तुरळक लव अंकुरुनी आली !
नव-कवितेच्या या फसव्या शब्दांखाली
ही कॉंग्रेस गवतापरि बहरली, व्याली
वाचे न कुणी, छापे न कुणी संपादक,
"या जळोत कविता -- यांस कुणी ना वाली !"
कविता न कराव्या; हट्ट अता सोडावा,
कोठून कथेपरि पैसा त्यात मिळावा ?
जात्याच भिकारी, एकच मज आकांक्षा,
ना मिळोत पैसे, क्षणभर व्हावी "वा, वा !"
Labels: विडंबन
0 Comments:
Subscribe to:
Post Comments (Atom)